मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी (१४ जुलै) सूरज नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. देशातून नामशेष झालेले चित्ते काही महिन्यांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. मात्र, या चित्त्यांपैकी आठ चित्ते गेल्या चार महिन्यांत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, या चित्त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गळ्यात लावण्यात आलेल्या कॉलर आयडीमुळे या चित्त्यांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आफ्रिकेतील तज्ज्ञांनी अभ्यास करून तसा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आणलेल्या चित्त्यांचा मृत्यू का होत आहे? चित्त्यांना कॉलर आयडीची काय अडचण असावी? कॉलर आयडीमुळे चित्त्यांचा खरोखरच मृत्यू होत असेल, तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अन्य कोणते पर्याय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा