२०१४ साली भाजपाप्रणित एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त करत सत्ता स्थापन केली. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपाला बहुमत प्राप्त झाले. मात्र, २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर बहुमत प्राप्त करता आलेले नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. या निवडणुकीमध्ये, एकीकडे एनडीए आघाडीच्या जागा घटल्या असून इंडिया आघाडीच्या जागांमध्ये चांगली वाढ झाली आहे. या निवडणुकीच्या आधीच एनडीए आघाडीचे अनेक घटक पक्ष भाजपाची साथ सोडताना दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (२०२० मध्ये एनडीएतून बाहेर) आणि फूट न पडलेल्या शिवसेनेचा (२०१९ मध्ये एनडीएतून बाहेर) समावेश होता.

हेही वाचा : मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?

Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : लोकशाहीत टीका अविभाज्य घटक
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

१८ जुलै २०२३ रोजी एनडीए आघाडीने बैठक घेऊन आपल्याबरोबर २८ पक्ष असल्याची घोषणा केली. त्यावेळी इंडिया आघाडीबरोबर १८ घटक पक्ष होते. निवडणुकीआधी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी), नितीश कुमार यांचा जनता दल (युनायडेट) आणि एआयडीएमकेसारख्या पक्षाने इंडिया आघाडीची साथ सोडली आणि एनडीए आघाडीत जाणे पसंत केले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने एनडीए आघाडीला आणि त्यातील घटकपक्षांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एनडीए आघाडीने २७२ चा जादुई आकडा पार केला असला तरीही भाजपाला फक्त २३९ जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाला आपल्या घटक पक्षांचा आधार आवश्यक आहे. त्यामध्ये टीडीपी आणि जेडीयू या दोन पक्षांचा वाटा मोठा असणार आहे. दुसरीकडे, एनडीएतील काही घटक पक्षांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडूनही केला जाऊ शकतो. अशा पार्श्वभूमीवर एनडीएतील कोणते घटक पक्ष भाजपाबरोबर राहू शकतात आणि कोणते पक्ष भाजपाची साथ सोडू शकतात आणि त्याची कारणे काय, याची माहिती घेऊयात.

तेलुगु देसम पार्टी

टीडीपीने १९९६ साली पहिल्यांदा एनडीएमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी एन. चंद्राबाबू नायडू तरुण नेते होते. २०१८ साली एनडीएची साथ सोडल्यानंतर या पक्षाला मोठा फटका बसला. पक्षाला तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त २ तर २०१९ मध्ये झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त २३ जागा मिळाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीडीपीने यूपीएमध्ये प्रवेश केला होता. मात्र, टीडीपीने गेल्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा एनडीएमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये १७५ पैकी १३४ जागांवर टीडीपीला विजय मिळाला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये टीडीपीला १६ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच टीडीपी ‘किंगमेकर’ ठरणार आहे.

दुसरीकडे, इंडिया आघाडीतील नेते चंद्राबाबू नायडूंना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. जर त्यांनी सत्तेत येण्यासाठी इंडिया आघाडीला मदत करण्याचे ठरवले तर ते अनेक मंत्रिपदाची अपेक्षा करू शकतात. मात्र, टीडीपी एनडीएबरोबरच राहण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला अद्यापही त्यांची गमावलेली लोकप्रियता पुन्हा मिळवता आलेली नाही. दुसरे कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये टीडीपीने भाजपाबरोबर प्रचार केला आहे. निवडणुकीनंतर भाजपाची साथ सोडणे टीडीपीला राज्याच्या भविष्यातील राजकारणात आणि राष्ट्रीय राजकारणातही महाग पडू शकते.

जनता दल (युनायडेट)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राजकारण अविश्वासार्ह मानले जाते. त्यांनी याआधी अनेकदा एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये उड्या मारल्याने त्यांना ‘पलटूराम’ असेही संबोधले जाते. एकेकाळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, कालांतराने त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. नितीश कुमार अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिले होते. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांनी एनडीएला रामराम केला.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राजद, जेडीयू आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने दमदार कामगिरी करत भाजपाला आस्मान दाखवले. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाबरोबर वारंवार खटके उडाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये युतीतून बाहेर पडणे पसंत केले. त्यानंतर ते २०२२ मध्ये पुन्हा राजदबरोबर आले आणि आता २०२४ मध्ये ते पुन्हा एनडीए आघाडीमध्ये सामील झाले आहेत.

त्यांनी वारंवार आपली निष्ठा बदलल्यामुळे त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता संपल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही या लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीयूला १२ जागा प्राप्त झालेल्या असल्यामुळे ते ‘किंगमेकर’ ठरणार आहेत. कदाचित ते स्वत:ही ‘किंग’ होऊ शकतील, इतपत महत्त्व त्यांना आता प्राप्त झाले आहे. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये जेडीयू हा तिसरा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय भाजपाला सत्तेत राहणे अवघड आहे. दुसरीकडे, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने त्यांचा पाठिंबा मागितल्यास ते त्यांच्याबरोबरही वाटाघाटी करून आपल्या पदरात बऱ्याच गोष्टी पाडून घेऊ शकतात.

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)

लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख राम विलास पासवान हे भारतीय राजकारणातील ‘हवामानतज्ज्ञ’ म्हणून ओळखले जायचे. निवडणुकीत हवा कुणाच्या बाजूने आहे, हे बरोबर ओळखून ते त्यांच्याबरोबर जायचे. वाजपेयींच्या सत्ताकाळात रामविलास पासवान एनडीए आघाडीबरोबर होते. त्यानंतर मोदी लाट येण्यापूर्वीच हवेचा रोख ओळखून त्यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये एनडीएमध्ये पुन्हा प्रवेश केला. लोक जनशक्ती पार्टी पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी ते आपल्या राजकीय अनुभवाचा वापर चतुराईने करायचे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर आता लोक जनशक्ती पार्टी पक्षाचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र चिराग पासवान यांना प्राप्त झाला आहे. ते आपल्या वडिलांचा राजकीय वारसा किती प्रभावीपणे चालवू शकतील, याबाबत साशंकता आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पार्टीला पाच जागांवर आघाडी आहे. आतापर्यंत तरी लोक जनशक्ती पार्टी एनडीए आघाडीबरोबर एकनिष्ठ राहिला आहे. मात्र, सत्तेत येण्यासाठी इंडिया आघाडीला ५ जागा कमी पडू लागल्या तर अधिकाधिक मंत्रिपदे आपल्या खिशात घालून लोक जनशक्ती पार्टी आपली निष्ठा बदलू शकतो.

शिवसेना (शिंदे गट)

शिवसेनेने आजवर भाजपाच्या खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचे राजकारण केले आहे. १९८४ साली पहिल्यांदा शिवसेनेने भाजपाबरोबर युती केली. मात्र, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने एनडीएशी फारकत घेतली. २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पाडण्यात भाजपाला यश आले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बहुतांश आमदार आपल्याबरोबर घेत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. सध्या ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हदेखील शिंदे गटाकडे गेले आहे. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही आहे. अजित पवार गटाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही मिळवत भाजपाशी संग केला आहे.

या निवडणुकीमध्ये, शिवसेना-शिंदे गटाला सात जागांवर, तर शिवसेना-उद्धव ठाकरे गटाला नऊ जागांवर आघाडी आहे. मात्र, एकनाथ शिंदे गट भाजपाबरोबरच राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि लोकसभा निवडणुकीत केलेली दमदार कामगिरी पाहता त्यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते त्यांच्याकडे परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रालोद आणि जेडीएस

एकेकाळी विरोधकांच्या आघाडीत असणारे हे दोन्हीही पक्ष आता एनडीए आघाडीबरोबर आहेत. उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल आणि कर्नाटकमधील जनता दल (सेक्यूलर) या दोन पक्षांनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली आहे. या दोन्हीही पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर आघाडी आहे. त्यांना काही फायदा होत असल्यास ते इंडिया आघाडीची वाट धरू शकतात.