एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या हा आता आधुनिक निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गेल्या काही निवडणुकांमध्ये तर प्रत्यक्ष निकालदिवसाइतकीच उत्सुकता मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी एग्झिट पोलबाबतही असते. या चाचण्या किती अचूक असतात, त्या फसल्याची उदाहरणे किती, याविषयी…

एक्झिट पोल किती अचूक असतात?

अलीकडे बहुतेक चाचण्या ३ ते ५ टक्के त्रुटींना (मार्जिन ऑफ एरर) वाव असल्याचे सांगत असतात. भारतातील एकूण मतदारांची संख्या, प्रत्यक्ष मतदानात भाग घेणाऱ्यांचे प्रमाण आणि नमुना सर्वेक्षणाचे प्रमाण (सँपल सर्व्हे साइझ) यांत मोठी तफावत नेहमीच आढळून येते. अशा परिस्थितीत अंतिम अंदाजामध्ये ३ ते ५ टक्के अधिक वा वजा त्रुटी आढळू शकते हा दावा धाडसी म्हटला पाहिजे. परंतु काही चाचण्यांनी तेवढी अचूकता प्राप्त केलेली आहे आणि जे खरोखरच कौतुकपात्र ठरते. अर्थात अचूकतेमध्ये सातत्य अलीकडे वाढलेले दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्व चाचण्यांचे निष्कर्ष एनडीएला मोठे बहुमत मिळणार असे होते, जे खरे ठरले. अर्थात भाजप आणि मित्रपक्षांच्या जागांबाबत अंदाज मात्र वेगवेगळे होते. 

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
akshay shinde encounter
आरोपी मेल्याचे दु:ख नाही, पण…
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!

हेही वाचा >>> महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात, तरी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त का? ‘लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?

अंदाज चुकल्याची ठळक उदाहरणे कोणती?

काही वेळा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष साफ फसल्याचेही दिसून आले आहे. किंवा काही वेळा एखादा अंदाज इतर अंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, आणि अखेरीस तोच अचूक ठरला असेही घडले आहे. 

‘इंडिया शायनिंग’ सपशेल फसले, २००४…

जनमानसात चांगली प्रतिमा असल्याचे वाटून त्यावेळच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने निवडणुका मुदतीच्या जरा आधी घेतल्या. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांतील यशाने त्यांना हुरूप आला होता. अनेक मतदानोत्तर चाचण्यांनीही एनडीएला २४० ते २७५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला. प्रत्यक्षात एनडीएला १८७ जागा मिळाल्या आणि काँग्रेसप्रणीत यूपीएला २१६ जागा मिळून त्यांचेच आघाडी सरकार सत्तेवर आले. 

बिहार विधानसभा निवडणूक २०१५, २०२०…

बिहारमध्ये २०१५च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आघाडी आणि राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज बहुतेक एग्झिट पोलनी वर्तवला होता. यांतील काही अंदाजांमध्ये भाजप आघाडीच्या बाजूने झुकते माप दिले गेले. प्रत्यक्षात भाजपविरोधी आघाडीने २४३पैकी १७८ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. याच्या जवळपास उलट परिस्थिती बिहार विधानसभा निवडणूक २०२०मध्ये पाहावयास मिळाली. तेजश्वी यादव यांच्या आधिपत्याखालील ‘महागठबंधन’ला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला गेला. पण अखेरीस भाजप-जदयु आघाडीने महागठबंधनला चकवून सत्ता ग्रहण केली. 

हेही वाचा >>> AC Blast: कडक उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याची कारणं काय? कोणती खबरदारी घ्यावी?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७…

या निवडणुकीत त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येईल आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष असेल, असा अंदाज बहुतेक सर्व मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्ष निकाल सर्वांसाठी धक्कादायक होता. भाजपने ४०३पैकी ३१२ जागा जिंकल्या, ज्या २०१२च्या तुलनेत ४७ अधिक होत्या.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१…

या निवडणुकीदरम्यान किमान दोन महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या एग्झिट पोलनी भाजप हा सर्वांत मोठा पक्ष बनेल, असे भाकीत वर्तवले होते. भाजपने त्या निवडणुकीत ७७ जागा जिंकल्या, ज्या पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात लक्षणीय ठरल्या. परंतु तृणमूल काँग्रेसने २९४पैकी २१३ जागा जिंकून राक्षसी बहुमत संपादित केले, ज्याचा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता. 

मोदींची निवडणूक, २०१४…

नरेंद्र मोदी त्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले होते. भाजपप्रणीत एनडीए या निवडणुकीत बहुमताच्या म्हणजे २७३च्या जवळपास जाईल असा अंदाज एग्झिट पोलनी वर्तवला होता. केवळ न्यूज ट्वेण्टीफोर – चाणक्य यांनी ३४० असा आकडा एनडीएसाठी दिला. भाजपला एकट्याला बहुमत मिळेल असेही बाकीच्यांना वाटले नव्हते. पण प्रत्यक्षात तसेच घडले. याही वेळी एग्झिट पोल पूर्णतया अचूक ठरले नव्हते.