लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपकडून एक आकडी जागांवर बोळवण केली जाईल आणि ठाणे जिल्ह्यातील मोजक्या जागांचा अपवाद वगळला तर मुंबईत शिंदेसेनेच्या पदरात फारसे काही पडणार नाही या अटकळींना मुख्यमंत्र्यांनी मुसद्दीपणाने तथ्यहीन ठरविल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. जागावाटपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून लोकसभेच्या किमान १५ जागा आणि शक्य झाल्यास १६ जागा तरी आमच्या वाट्याला येतील असा दावा शिंदे यांचे निकटवर्तीय करत होते. मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपने त्यांची कोंडी केली खरी. मात्र चर्चेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ठाण्याच्या शहरी पट्ट्यातील एकही मतदारसंघ भाजपला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपमधील दिल्लीश्वरांच्या मदतीने घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, मुंबई महानगर पट्ट्यातील १० पैकी पाच जागा मिळवत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या या नव्या बालेकिल्ल्यातही स्वत:ची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा