ही योजना कशासाठी?
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तसेच अवर्षणप्रवण भागात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी उर्वरित किमतीच्या २५ टक्के अर्थसहाय्य विशेष पॅकेज म्हणून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ही ती बळीराजा जलसंजीवनी योजना. या योजनेतून २०१८ ते २०२५ या सात वर्षांमध्ये सरकारने ८३ लघुपाटबंधारे, तसेच ८ मोठ्या व मध्यम जलसिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे ठरवले. कामे पूर्ण झाल्यावर सुमारे ३ लाख ७६ हजार ९१५ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या योजनेतून एकूण ९१ प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारकडून २५:७५ या प्रमाणानुसार अर्थसहाय्य घोषित केले असून केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उभारण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. या योजनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील ८३ लघुपाटबंधारे प्रकल्पांसह ३ मोठे प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील ३ आणि पश्चिम महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा