विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे उत्साह दुणावलेल्या भाजपने गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यातही आक्रमक राजकारण सुरू केले आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपने गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील एकमेव चेहऱ्यास संधी दिली. नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सोपविण्यात आले. नाईक यांच्या पाठोपाठ डोंबिवलीतील पक्षाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद सोपविले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले किसन कथोरे यांना ताकद देताना ‘तुमच्यामागे मुख्यमंत्री उभा आहे’ असे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिंदे यांच्या ठाण्यात येत्या २४ तारखेला गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे. नाईक यांच्या पाठोपाठ संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघा आमदारांनीही आठवड्यातून दोन दिवस ठाणेकरांसाठी असाच ‘दरबार’ भरविण्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात भाजपच्या मंत्री, आमदारांना लोकांमध्ये जाण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे हे दरबार पक्षवाढीसाठी पूरक ठरावेत अशा पद्धतीची रचना करण्यात आली असली तरी यामागे शिंदे यांची कोंडी करण्याचे राजकारण सुरू आहे का, अशी कुजबूजही सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा