नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नीट-पीजी परीक्षा ही वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे खासगी, तसेच सरकारी महाविद्यालयांमधील प्रवेश निश्चित केले जातात. या देशव्यापी परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या वर्षी ही परीक्षा ५ मे रोजी आयोजित करण्यात आली होती आणि तिचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. या वर्षी अनपेक्षितपणे तब्बल ६७ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च गुण प्राप्त झाल्यानंतर या परीक्षेबाबत शंका व्यक्त करण्यात येऊ लागली. काही विद्यार्थ्यांनी आपल्याला पुरेसा वेळ दिला गेला नसल्याची याचिका उच्च न्यायालयांमध्ये दाखल केली होती. त्यानंतर १,५६३ उमेदवारांना वाढीव गुण (ग्रेस मार्क्स) देण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून ६७ विद्यार्थ्यांना सर्वोच्च गुण प्राप्त झाले होते. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने १,५६३ उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा