औरंगजेबाची स्तुती केल्यावरून समाजवादी पक्षाचे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले आझमी अनेक वेळा वादात सापडतात. एकाच वेळी दोन मतदारसंघातून विजयी होण्याचा राज्यात त्यांचा विक्रम आहे. २००९ मध्ये भिवंडी (पूर्व) तसेच मानखुर्द शिवाजी नगर या ठिकाणांहून ते निवडून आले होते. त्यातील मानखुर्द हा मतदारसंघ त्यांनी ठेवत भिवंडीचा राजीनामा दिला. पुढे तीन वेळा त्यांनी येथून विधानसभा गाठली.
विधानांनी वाद
उत्तर प्रदेशातील आझमगड हे अबू आझमींचे जन्मगाव. तेथून येऊन मुंबईच्या राजकारणात त्यांनी बस्तान बसविले. बॉम्बस्फोटाच्या आरोपातून मुक्त झाल्यावर १९९५ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. वादग्रस्त विधानांनी यापूर्वीही चर्चेत होते. यापूर्वी बहुचर्चित शक्ती मिल बलात्कार खटल्यात त्यांंनी महिलाविरोधी विधाने केल्याचा आरोप झाला होता. याखेरीज २०१७ मध्ये बंगळुरू येथील विनयभंग प्रकरणानंतर महिलांनी रात्री उशिरापर्यंत एकटे फिरायला जाऊ नये, असे भाष्य करत वाद ओढवून घेतला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा