-मंगल हनवते
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नुकतेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर द्रुतगती महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा प्रकर्षाने समोर आला आहे. महामार्ग मृत्यूचा सापळा होत चालल्याचा गंभीर आरोप होत आहे. तर वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचा आरोप सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. त्यामुळे आता वाहतुकीलाच शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा/प्रणालीचा आधार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सोमवारी विधिमंडळात महिती दिली. ही प्रणाली म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस). ही यंत्रणा नेमकी काय आहे, ती कशी काम करते, त्यामुळे अपघात रोखले जातील का, याचा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा