100 Years of Mumbai Local Train: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स (EMU) म्हणजेच लोकल ट्रेनला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन चार डब्यांसह व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – CSMT) ते कुर्ला या दरम्यान धावली आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. तत्कालीन मुंबईचे (बॉम्बे) गव्हर्नर असलेल्या सर लेस्ली विल्सन आणि त्यांची पत्नी लेडी विल्सन यांनी या पहिल्या प्रवासाचा शुभारंभ केला होता. पहिली इलेक्ट्रिक ट्रेन मोठ्या जल्लोषात सकाळी १० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. ही ऐतिहासिक EMU ट्रेन जहांगीर फ्रामजी दारुवाला यांनी चालवली होती. त्यामुळेच ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे मोटरमन म्हणून इतिहासात अजरामर झाले.

ऐतिहासिक टप्पा

या ऐतिहासिक घटनेने भारत आणि संपूर्ण आशियामध्ये विद्युत रेल्वे वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात केली. या परिवर्तनामुळे रेल्वे व्यवस्थापनात क्रांती झाली. विद्युतीकरणामुळे कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली, प्रवासाचा कालावधी कमी झाला आणि कमी खर्चात टिकाऊ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध झाला. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे भारतीय रेल्वे प्रवासात मोठा बदल घडला. वारंवार इंजिन बदलण्याची गरज संपली, प्रवासासाठी लागणारा वेळ कमी झाला, विश्वासार्हता वाढली आणि परिचालन खर्च कमी झाला. भारतीय रेल्वेचा हा टप्पा १९२५ च्या एका इलेक्ट्रिफाइड मार्गापासून आजच्या विस्तृत नेटवर्कपर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे.

Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर
mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
mega block between CSMT Masjid stations for Karnak flyover work halts Konkan Railway trains
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, वंदे भारतसह जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावणार
Itwari Nagbhid Railway Maharail project
मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यात पाच वर्षांपासून महारेलचा प्रकल्प रखडला

१०० वर्षांच्या प्रगतीचे प्रतीक

१८२५ साली जगातील पहिली ट्रेन धावली, तर १६ एप्रिल १८५३ हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी भारतातील पहिली ट्रेन बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान धावली. मात्र, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. भारतातील पहिली वीजेवर चालणारी ट्रेन व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – CSMT) ते कुर्ला या दरम्यान सुरू करण्यात आली. म्हणूनच २०२५ हे वर्ष भारतासाठी विद्युत रेल्वेचा १०० वा वर्धापन दिन म्हणून साजरे केले जात आहे आणि याच वर्षात ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या १००% विद्युतीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. हे यश भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाइतकेच ऐतिहासिक ठरणार असून विद्युतीकरणाच्या क्षेत्रातील १०० वर्षांच्या प्रगतीचे प्रतीक आहे.

वाढत्या मुंबईसाठी उपयुक्त

जगातील पहिली रेल्वे सुरू झाल्यानंतर फक्त २८ वर्षांतच भारतात रेल्वे धावायला सुरुवात झाली. परंतु, विद्युत ट्रॅक्शन स्वीकारण्याची प्रक्रिया तुलनेने धीम्या गतीने झाली. जगातील पहिली विद्युत प्रवासी ट्रेन १८७९ साली जर्मनीत सुरू झाली, तरीही हे तंत्रज्ञान भारतात येण्यासाठी आणखी ४६ वर्षे लागली. विद्युत ट्रॅक्शनने स्टीम इंजिनच्या तुलनेत अनेक महत्त्वाचे फायदे झाले. विद्युत इंजिनांना कमी देखभालीची गरज होती, ते प्रदूषणमुक्त होते आणि तीव्र चढांवरून अधिक जड आणि लांब गाड्या सहजतेने ओढण्यास सक्षम होते.

विद्युतीकरणाचा फायदा वाढत्या लोकसंख्येला

विद्युतीकरणाच्या सुरुवातीच्या अधिक खर्चामुळे अडथळे निर्माण झाले. परंतु त्याचे फायदे उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी झाले. या तंत्रज्ञानाची विशेष गरज जड वाहतुकीसाठी आणि तीव्र चढ-उतार असलेल्या मार्गांसाठी होती. त्यामुळे ते त्या काळातील बॉम्बे (आताचे मुंबई) सारख्या शहरी भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. २० व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे प्रवासी वाहतुकीसाठी प्रभावी उपायांची गरज निर्माण झाली. स्टीम इंजिन पुणे आणि नाशिकच्या चढ-उतार असलेल्या मार्गांवर चालवण्यासाठी अपुरी ठरत होती, त्यामुळे विद्युतीकरण हा अत्यावश्यक उपाय असल्याचे अधोरेखित झाले.

मुंबई रेल्वे विद्युतीकरणाचा इतिहास

१९०४ साली बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारचे प्रमुख अभियंता W.H. White यांनी शहराला सेवा देणाऱ्या दोन प्रमुख रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (GIP) (आजची मध्य रेल्वे), बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे (BB&CI) (आजची पश्चिम रेल्वे) अशी ही नेटवर्क्स होती. पहिल्या महायुद्धामुळे हा प्रकल्प उशीराने सुरू झाला, परंतु १९२० पर्यंत मुंबई-पुणे, इगतपुरी आणि वसई मार्गाच्या विद्युतीकरणाच्या योजना मंजूर करण्यात आल्या.

३ फेब्रुवारी १९२५: भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन

भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ३ फेब्रुवारी १९२५ रोजी चालवण्यात आली. सीएसएमटी (व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला या १६ किमीच्या अंतरावर १५०० व्होल्ट (V) डायरेक्ट करंट (DC) प्रणाली वापरून ती चालवली गेली. यामुळे भारतात स्वच्छ आणि आधुनिक विद्युत वाहतुकीच्या युगाची सुरुवात झाली. भारत हा जगातील २४ वा आणि आशियातील तिसरा देश ठरला, ज्या देशाने इलेक्ट्रिक रेल्वे सुरू केली.

दक्षिण भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे

मुंबईबरोबरच दक्षिण भारतीय रेल्वेने (SIR) देखील आपले उपनगरीय नेटवर्क विद्युतीकरण करण्यास सुरुवात केली. मद्रास बीच (आताचे चेन्नई) ते तांबरम मार्गावर 1500 V DC प्रणाली वापरण्यात आली. १९३१ साली हे विद्युतीकरण पूर्ण झाले आणि हा विभाग भारतामधील मीटर गेज मार्गावर विद्युतीकरण झालेल्या थोडक्या मार्गांपैकी एक राहिला.

स्वातंत्रोत्तर प्रगती

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत फक्त ३८८ किलोमीटर रेल्वे मार्गाचेच विद्युतीकरण झाले होते आणि ते प्रामुख्याने मुंबई आणि मद्रास (आताचे चेन्नई) या परिसरातच मर्यादित होते. गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या स्मरणार्थ एक विशेष लोगोचे अनावरण केले आणि शताब्दी उत्सवाच्या प्रारंभाचा भाग म्हणून एक जिंगल लाँच केली.

मुंबईच्या लोकल ट्रेनचा इतिहास

१९२५ साली चार डब्यांच्या EMU (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेनच्या प्रवासाने भारतातील विद्युत रेल्वे वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. यानंतर १९२७ साली आठ डब्यांच्या EMU गाड्या हार्बर आणि मुख्य मार्गावर सुरू करण्यात आल्या. १९६१ मध्ये नऊ-डब्यांच्या लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या. १९८६ मध्ये १२डब्यांच्या लोकल सेवा सुरू झाल्या. २०१६ मध्ये १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या. २०२० मध्ये मध्य रेल्वेवर पहिली वातानुकूलित (AC) लोकल ट्रेन सुरू करण्यात आली. असे असले तरी भारतीय रेल्वेच्या १०० वर्षांच्या विद्युतीकरणाच्या प्रवास हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. ज्याने देशातील रेल्वे वाहतूक जलद, स्वच्छ आणि अधिक प्रभावी ठरवली आहे.

Story img Loader