दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिकांची घोषणा केली जाते. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या तीन विज्ञान शाखांमध्ये अतुलनीय कामगिरीसाठी दिला जातो. या विषयात भारताला नोबेल पारितोषिक मिळवून ९४ वर्षे झाली आहेत. १९३० साली डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामण यांना भौतिकशास्त्रातील त्यांच्या विशेष कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. भारतीय वंशाच्या आणखी तीन शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिक जिंकले आहेत. १९६८ साली हरगोविंद खोराना यांना वैद्यकशास्त्रात, १९८३ साली सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रात आणि २००९ साली वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्रातील त्यांच्या कामगिरीसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. असे असले तरी तिघांनीही त्यांचे कार्य भारताबाहेर केले आणि त्यांना सन्मानित करण्यात आले, तेव्हा ते भारतीय नागरिक नव्हते. इतक्या वर्षांत भारताला एकही नोबेल पदक न मिळण्याचे कारण काय? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा