देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषणाची वाढती समस्या पाहता, तेथे पुन्हा एकदा ‘सम-विषम वाहन क्रमांक’ (ऑड-इव्हन) प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत १३ ते २० नोव्हेंबरदरम्यान दिवाळीच्या दिवसांमध्ये सम-विषम वाहन क्रमांक योजना लागू केली जाणार आहे. दिल्लीत सध्या हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अतिवाईट आणि धोकादायक अशा दोन श्रेणींमध्ये आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे हा हवा निर्देशांक धोकादायक पातळी ओलांडून आणखी गंभीर होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सादर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी दिल्लीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक ४२१ वर पोहोचला होता; ज्यामध्ये पीएम २.५ या प्रदूषकाचे घटक अधिक होते. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा सतत ४५० च्या वर राहिलेला आहे. हा निर्देशांक ५० ते १०० च्या दरम्यान असणे चांगले मानले जाते. त्याहून अधिक निर्देशांक गेल्यास वायुप्रदूषणाचा त्रास होण्यास सुरुवात होते. अशा वेळी याआधी लागू केलेल्या सम-विषम योजनेचे परिणाम काय होते? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा