Why Did Hitler Invade Poland? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यादरम्यान राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली होती. ‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक पोलंडवासियांना देश सोडून विस्थापित व्हावं लागलं होतं. त्याचदरम्यान, भारतात आलेल्या जवळपास पाच हजार पोलंडवासियांना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी वळिवडे येथे मोठी वसाहत उभी केली होती. राहण्यासाठी खोल्या तसेच छोटं चर्चही बांधलं गेलं होतं. परिस्थिती निवळल्यानंतर पाच-सहा वर्षांनी हे पोलंडवासी मायदेशी परतले. मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने केलेली मदत पोलंडवासी विसरले नाहीत. छत्रपती घराण्याच्या सन्मानार्थ त्यांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे कोल्हापूर स्मारक उभारलं. काही वर्षांपूर्वी पोलंडने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांना पोलंडला विशेष अतिथी म्हणून बोलावलं होतं. पोलंडने संभाजीराजेंचा सन्मानही केला होता’. त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान पोलंडचे नागरिक क भारतात आले, त्यांच्या विस्थापनाचा इतिहास हा हिटलरशी संबंधित कसा आहे. मूळात त्यांना देश का सोडावा लागला आदी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे हे विश्लेषण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा