जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या बेधडक विधानांसाठी परिचित आहेत. नुकतीच त्यांनी ‘द वायर’ या वेबसाईटला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अक्षम्य निष्क्रियतेमुळे हा हल्ला झाला, असा दावा मलिक यांनी केला. शिवाय याबाबत त्याच दिवशी संध्याकाळी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला, पण त्यांनी मला शांत बसण्यास सांगितले, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला. मलिक यांच्या दाव्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप होतील. तत्पूर्वी चार वर्षांपूर्वी पुलावामा येथे हल्ला कसा झाला? त्यानंतर भारताने त्याला कसे उत्तर दिले? गृहखात्याने कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या? याबाबत घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा