पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लाओसमध्ये भेट झाली. त्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांची चर्चा रंगली आहे. दोघेही शुक्रवारी (११ ऑक्टोबर) लाओसच्या व्हिएन्टिनमध्ये असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) शिखर परिषदेला उपस्थित होते. दोन्ही देशांतील वास्तविक समस्या सोडविण्याची गरज असल्याचे आपण पंतप्रधान मोदींना सांगितले असल्याचा दावा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. मात्र, भारताने दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाल्याच्या करण्यात येणाऱ्या दाव्यावर नकार दिला. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत असल्याचे चित्र आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध जोडला गेला होता. हा आरोप भारत सरकारने हास्यास्पद आणि प्रेरित म्हणून फेटाळून लावला होता. जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान मोदींची भेट चर्चेचा विषय का ठरत आहे? भारत आणि कॅनडाचे संबंध का बिघडले? याबाबत जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा