पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १०२ व्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात मियावाकी वृक्षारोपणाबाबत भाष्य केले. मियावाकी ही जपानमधील लोकप्रिय वृक्षलागवड करण्याची पद्धत असून शहरांमध्ये छोट्या जागेत घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील शिक्षक रफी रामनाथ यांचेही उदाहरण दिले. रामनाथ यांनी मियावाकी तंत्र वापरून नापिक जमिनीवर जंगल फुलवले. या छोट्याश्या जंगलाला त्यांनी विद्यावनम असे नाव दिले असून त्याठिकाणी ११५ प्रकारची वेगवेगळी वृक्ष आहेत. दरम्यान हवामान बदलाचा सामना करणे, प्रदुषणाच्या पातळीवर अंकुश लावणे आणि शहरातील हरितपट्ट्यामध्ये वाढ करावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईच्या मोकळ्या जागांवर मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. ही पद्धत नेमकी कशी असते? याचा काय फायदा होतो, याबद्दल जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा