कल्याणीनगर येथील आलिशान चारचाकी अपघात प्रकरणातील आरोपीचा जामीन बुधवारी (२२ मे) रद्द करण्यात आला आहे. या १७ वर्षीय आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दोन जणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला निव्वळ अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन कसा काय दिला जाऊ शकतो, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. अगदी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावरून आश्चर्य व्यक्त केले होते. ते म्हणाले होते, “बाल न्याय मंडळाचा हा आदेश धक्कादायक आहे. आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याहून अधिक मी काही बोलू इच्छित नाही. सरतेशेवटी दोन जणांचा जीव गेला आहे. दुसरीकडे, अगदी सहजपणे आरोपीला अल्पवयीन असल्यामुळे सोडून देणे ही बाब सहन होण्यासारखी नाही.” आता या आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून, त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इथे हा अल्पवयीन आरोपी किती काळ राहू शकतो? पुढे काय होऊ शकते? ते पाहू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा