या निवडणुकीमध्ये जातनिहाय जनगणना, देशाचे आर्थिक सर्वेक्षण आणि आर्थिक न्याय देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी या मूलभूत मुद्द्यांवर काँग्रेस सामान्यांचे लक्ष वेधू इच्छित असल्याचे स्पष्ट दिसते आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्यायपत्र’ असे नाव दिले आहे. त्यामुळे सामाजिक-आर्थिक न्याय अशा वास्तवातील मुद्द्यांवर जनतेचा क्षोभ अधिकाधिक वाढावा आणि त्या मुद्द्यांवर मतदान होऊन आपण सत्तेत यावे, असे समीकरण काँग्रेसने मांडले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपत्तीचे फेरवाटप करून देशातील मुस्लिमांना हिंदूंची संपत्ती वाटू इच्छित असल्याचा आरोप करत या साऱ्या प्रकरणाला एक वेगळीच दिशा दिली आहे. त्यातच आता काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या ‘वारसा करा’ संदर्भातील एका वक्तव्यामुळेही या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. आपण आता याबाबतच अधिक जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा