भारतीय राजकारणाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर गांधी-नेहरू कुटुंबाच्या राजकारणाचाही अभ्यास हमखास करावा लागतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेले आहे. सध्या गांधी घराण्यातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही त्रयी राजकारणात सक्रिय आहे. वरील नेत्यांनी वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकांत वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीत्व केलेले आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघाशी गांधी कुटुंबाचे खास नाते आहे. गांधी कुटुंबातील अनेकांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयही मिळवलेला आहे. त्यामुळे अमेठी मतदारसंघ आणि गांधी कुटुंबाचा संबंध काय ? या जागेवर आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी निवडणूक लढवलेली आहे? हे जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा