Rajnath Singh on 1965 War: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे अलीकडेच म्हणाले की, १९६५ साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर भारत सरकारने सैनिकांनी मिळवलेल्या धोरणात्मक यशाचा चर्चेच्या व्यासपीठावर योग्य वापर केला असता तर, सीमा ओलांडून होणारी घुसखोरीची समस्या सोडवता आली असती. १४ जानेवारीला जम्मूच्या अखनूर येथे आयोजित केलेल्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “१९६५ साली भारतीय सैन्याने हाजी पीर येथे तिरंगा फडकवण्यात यश मिळवले होते आणि त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर ते स्थळ परत दिले गेले नसते, तर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे मार्ग बंद करता आले असते.” मात्र, त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “ही कोणत्याही प्रकारची टीका नाही; जे काही घडले, त्यामागे काहीतरी विचार नक्कीच असणार आणि यावर मी येथे चर्चा करू इच्छित नाही.” १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध का झाले? त्यानंतर काय घडले आणि घुसखोरी रोखण्यासाठी हाजी पीरचे महत्त्व काय आहे? याचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा