भारतीय इतिहासात मौर्य साम्राज्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मौर्य वंशातील सम्राट चंद्रगुप्तापासून ते सम्राट अशोकापर्यंत प्रत्येक राजाने राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. या राजांच्या परंपरेतील सम्राट अशोकाची इतिहासातील भूमिका अनेकार्थाने महत्त्वाची ठरली आहे. भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या या राजाने बौद्ध धर्माच्या माध्यमातून भारताबाहेरही भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. याची साक्ष त्याने कोरून घेतलेल्या शिलालेखांमधून मिळते. अशोकाने त्याच्या हयातीत ८४ हजार स्तूप उभारल्याचे मानले जाते. ही काहीशी अतिशयोक्ती असली, तरी भारतात बऱ्याच ठिकाणी सम्राट अशोकाच्या कालखंडात स्तूप उभारले गेले होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्या या कार्याचा पुरावा ९० च्या दशकात सन्नती या पुरातत्त्वीय स्थळाच्या रूपाने समोर आला. याच स्थळाच्या पुनरुज्जीवनाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या स्थळाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा