हृषिकेश देशपांडे
तमिळनाडूतील राजकारण गेली पाच दशके द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन पक्षांभोवतीच फिरत आहे. राज्यात स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक आघाडी सत्तेत आहे, तर अण्णा द्रमुक विरोधी पक्षात आहे. काँग्रेस असो वा भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष अनुक्रमे द्रमुक व अण्णा द्रमुकबरोबर आघाडीत आहेत, ते दुय्यम जोडीदार म्हणूनच. जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू आहे. अंतरिम सरचिटणीस इ़डापडी के पलानीस्वामी (ईपीएस) यांच्या निवडीने पक्षात उभी फूट पडली आहे. ओ पन्नीरसेल्वम (ओपीएस) यांना पक्षातून निलंबित केल्याने वाद वाढला आहे. पक्षात एकमुखी नेतृत्व की सामूहिक अशा कात्रीत अण्णा द्रमुक सापडलाय. या वादळात अण्णा द्रमुकचे निवडणूक चिन्ह असलेली दोन पाने गळून पडणार काय, थोडक्यात पक्षात उभी फूट पडणार अशीच चिंता आहे. मद्रास उच्च न्यायालयाने पक्षातील वादाबाबत नुकताच एक निर्णय देत सामूहिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र या दोन नेत्यांमधील संघर्ष पाहता ते एकत्र कितपत येतील याबाबत शंका आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा