Rules and History of Hoisting of Indian National Flag जगातील प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा ध्वज आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताची तब्बल दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून सुटका झाली. स्वातंत्र्य दिनाच्याच सुमारे २० दिवस आधी म्हणजेच २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत भारताचा राष्ट्रीय ध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वजा बद्दल ‘हा ध्वज जिथे फडकेल तिथे स्वातंत्र्याचा संदेश असेल’, या भावना व्यक्त केल्या होत्या. तर या ध्वजाखाली सर्व समान असतील आणि हा ध्वज कर्तव्य, जबाबदारी व त्याग यांचे प्रतीक असल्याची भावना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू यांनी प्रकट केली होती; तर स्वातंत्र्यसैनिक मुनिस्वामी पिल्लई यांनी राष्ट्रध्वज हा समाजातल्या सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्त्व करतो असे मत व्यक्त केले होते. एकूणच स्वतंत्र भारताचे प्रतीक असलेल्या तिरंग्याविषयी प्रत्येकाच्या जाणिवा या भिन्न असल्या तरी राष्ट्रध्वज ही अभिमानाचीच भावना होती आणि आहे. असे असले तरी राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार हा जनसामान्यांना नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून भारत सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेंतर्गत सामान्य भारतीय नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. हे सत्य असले तरी त्यापूर्वी भारतीय सामान्य नागरिकाला तिरंगा फडकविण्याचा अधिकार मिळावा यासाठी झालेल्या एका लढ्याविषयी आजच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिना निमित्ताने जाणून घेणे संयुक्तिक ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा