छत्तीसगडमधील ‘सतनामी’ समाज आक्रमक झाला आहे. गिरौदपुरी धाममधील अमरगुफतील एका मंदिराची विटंबना झाल्यामुळे हा समाज संतप्त झाला आहे. हे स्थळ पवित्र असल्याची सतनामी समाजाची भावना आहे. समाजातील काही लोकांनी सोमवारी (१० जून) छत्तीसगडमधील बलौदा बाजार जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाला आग लावली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर दगडफेकही केली आहे. या साऱ्या धुमश्चक्रीमध्ये शेकडो वाहने जळून खाक झाली आहेत. प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्गात मोडणारे सतनामी समाजाचे वा पंथाचे लोक छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सीमाभागात राहतात. अमरगुफेतील जैतखाम नावाच्या एका मंदिराची विटंबना झाली असल्याची त्यांची तक्रार आहे. सतनामी समाजासाठी पवित्र असलेले हे मंदिर गिरौद गावापासून पाच किमी अंतरावर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा