बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सोमवारी (५ ऑगस्ट) देशातून पलायन केले आणि त्या आता भारताच्या आश्रयाला आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर उज झमान यांनी, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्याचे जाहीर केले. तसेच, आता लष्कराच्या मदतीने अंतरिम सरकार लवकरच स्थापन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. बांगलादेशमधील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला १ जुलैपासून सुरुवात झाली होती. बांगलादेश उच्च न्यायालयाने देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकरीमध्ये ३० टक्के आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने आकार घेतला आणि त्याची परिणती आता पंतप्रधानांनी देशातून परागंदा होण्यामध्ये झाली आहे. मात्र, हे विद्यार्थी आंदोलन निमित्तमात्र आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या राजवटीविरोधात खदखदत असलेल्या असंतोषाचा तो परिपाक असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. गेल्या जानेवारीमध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. देशातील विरोधक आणि माध्यमांना मोडीत काढून निरंकुश सत्ता चालवल्याचा आरोप शेख हसीना यांच्यावर होत आहे. बांगलादेशच्या राजकारणामधील प्रमुख राजकीय खेळाडू कोण आहेत, याविषयी माहिती घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा