Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek History Significance छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु महाराजांचे राज्य अस्तित्त्वात येऊ नये यासाठी मुघल, आदिलशाह, कुतुबशाहआणि पोर्तुगीज या सर्वांचीच करडी नजर शिवाजी महाराजांवर होती. विशेषतः औरंगजेब हा शिवाजी महाराजांच्या भलताच मागावर होता. तरीही महाराजांनी आपल्या राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास शिवाजी महाराजांनी भाग पाडले. आपले राज्य निर्वेध झाले आहे, याची खात्री पटल्यावरच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले. मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य निर्माण करणे शिवाजी महाराजांना आवश्यक होते. आपल्या राज्यातील जनतेला सुखी करण्याचा संकल्प महाराजांनी सोडला होता. मुघलांच्या राज्यात जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची विटंबना आणि साधू संतांची अवहेलना होत होती. याच पार्श्वभूमीवर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. राज्य स्थिर झाल्यावर भावी काळात वारस निश्चित होण्यासाठी महाराजांना स्वतंत्र राजा घोषित करणे आवश्यक होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग होता. महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक दिग्गज अभ्यासकांनी आपल्या संशोधनात केले आहे. जदुनाथ सरकार, वा. सी. बेंद्रे, ग. भा. मेहेंदळे यांसारख्या मोठ्या इतिहासकारांचा यात समावेश होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा