लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेषत: महाराष्ट्राचा विचार करता, महाराष्ट्रातील येणाऱ्या लोकसभा, तसेच विधानसभा या दोन्ही निवडणुका आजवरच्या इतिहासातील वेगळ्या निवडणुका ठरणार आहेत. कारण काय? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची झालेली शकले! या दोन्ही पक्षांना आपापल्या नाव आणि चिन्हासाठी द्यावा लागलेला लढा सर्वश्रुत आहे. निवडणुकीचे चिन्ह हा एखाद्या पक्षासाठी फार महत्त्वाचा घटक असतो. निवडणुकीमध्येही त्याचे महत्त्व अनन्यसाधारण, असे असते. कारण- ती पक्षाची ओळख असते. मतदार त्या चिन्हावरूनच पक्षाला ओळखून आपले मत देत असतो. खासकरून निरक्षर मतदारांसाठी म्हणून ही सोय फार मोलाची ठरते. जेव्हा पक्ष फुटतात, तेव्हा ते निवडणूक आयोगामध्ये जाऊन चिन्हावर दावा करतात आणि त्यासाठी भांडतात. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात चिन्हांचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो? खासकरून, देशातील काँग्रेस आणि भाजपा या दोन मोठ्या पक्षांच्या चिन्हांचा काय इतिहास आहे? काँग्रेसला ‘हात’ आणि भाजपाला ‘कमळ’ चिन्ह कसे मिळाले, याचा रंजक इतिहास आपण पाहणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा