‘हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार’ हा घटनेच्या कलम १४ आणि २१ अंतर्गत लोकांना असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला व मनोज मिश्रा या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने २१ मार्च रोजी हा निर्णय दिला. सध्या गंभीरपणे धोक्यात असलेल्या माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्याच्या संवर्धनाशी संबंधित खटल्याचा हा निकाल आहे. गेल्या शनिवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे नमूद केले की, अलीकडच्या वर्षांमध्ये हवामान बदल आणि मानवी हक्क या दोन्ही विषयांवर अधिक तीव्रतेने लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्यामुळे राज्यांनी लोकांच्या हक्कांच्या दृष्टिकोनातून हवामानाच्या परिणामांना सामोरे जाण्याची अत्यावश्यकता असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा