नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात मागच्या आठवड्यात कुख्यात गुंड सुनील बल्यान ऊर्फ टिल्लू ताजपुरिया याचा इतर कैद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर तिहार तुरुंगात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या तामिळनाडू पोलिसांच्या कार्यशैलीवर खूप टीका झाली. तुरुंगातील सीसीटीव्ही चित्रणामध्ये तामिळनाडू विशेष दलाचे पोलीस हा हल्ला होत असताना निमूटपणे उभे असल्याचे दिसत आहेत. गुन्हा घडत असताना त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे ताजपुरियाचा तुरुंगातच खून झाला. दिल्लीच्या कारागृह विभागाच्या पोलीसप्रमुखांनी तामिळनाडू विशेष पोलीस दलाच्या महासंचालकांना पत्र पाठवून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या घटनेसाठी जबाबदार धरलेल्या सात अधिकाऱ्यांना निलंबित करून राज्यात माघारी बोलाविण्यात आले आहे. पण इतर राज्यांत अशा प्रकारे दुसरे राज्य आपले पोलीस तैनात करू शकते का? सुरक्षेचे कंत्राट सरकारी यंत्रणेला देता येते का? या विषयाचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा