-अन्वय सावंत

भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये वर्षानुवर्षे तणावाचे वातावरण आहे. या राजकीय तणावाचे पडसाद खेळांमध्येही उमटतात. विशेषतः भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध आले की, केवळ या दोन देशांतील नागरिकांचे नाही, तर संपूर्ण क्रिकेट जगताचे या सामन्याकडे लक्ष असते. आता हे दोन संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही आमनेसामने येणार असून या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Afghanistan Cricket Team Is Very Unhappy With Facilities Of Greater Noida Stadium
AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”

भारत-पाकिस्तान सामना कधी व कुठे खेळवला जाणार आहे?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (२३ ऑक्टोबर) एक लाख आसनसंख्या असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या पाच मिनिटांत विकली गेल्याची माहिती आहे. थेट ‘अव्वल १२’ फेरीत प्रवेश मिळालेल्या भारत आणि पाकिस्तानचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिलाच सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामीसाठी उत्सुक असतील. त्यातच भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या, तर पाकिस्तानच्या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे तारांकित खेळाडू असल्याने त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल.

दोन संघांमधील इतिहास काय सांगतो?

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आतापर्यंत ११ ट्वेन्टी-२० सामने झाले असून यापैकी आठ सामन्यांत भारतीय संघाने विजय नोंदवला आहे. उर्वरित तीन सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये या संघांत झालेल्या सहापैकी चार सामन्यांत भारतीय संघाने बाजी मारली, तर एका सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी ठरला. तसेच २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान साखळी सामना निर्धारित षटकांअंती बरोबरीत राहिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बोल-आउटमध्ये भारताने सरशी साधली होती. तसेच पाकिस्तानला नमवूनच भारताने २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपदही मिळवले होते. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मात केली होती. कोणत्याही (एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२०) विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत होण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याचा आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

भारत-पाकिस्तान सामन्यांना इतके महत्त्व का?

१९४७ साली झालेली फाळणी, युद्ध, काश्मीरचा मुद्दा आणि दहशतवाद अशा विविध कारणांमुळे भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये राजकीय तणाव आहे. याचा परिणाम खेळांवरही झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची दोन्ही देशांतील क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. परंतु अलीकडच्या काळात हे दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखीच बिघडले. २००९मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघाच्या बसवर लाहोर येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये दशकभराच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले नाहीत. २०१२मध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताचा दौरा केला. उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने झाले. ही या दोन संघांमधील अखेरची द्विदेशीय मालिका ठरली. त्यानंतर विविध कारणांस्तव भारत-पाकिस्तान मतभेद वाढत गेले. परिणामी दोन संघांंमधील सामन्यांची संख्याही कमी झाली. त्यामुळे आता ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आल्यावर या सामन्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

आर्थिक गणिते काय?

भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले की हा केवळ एक सामना नसतो. त्यामागे बरीच आर्थिक गणितेही असतात. एकीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे विश्वातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. भारत-पाकिस्तान सामन्यांचा या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांना आर्थिक फायदा होतोच, शिवाय ‘आयसीसी’ला महसुलासाठी हा सामना विशेष महत्त्वाचा ठरतो. तसेच संयोजक आणि जाहिरातदारही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐन दिवाळीत, त्यातच रविवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे. गेल्या दशकापासून अक्षरशः कोट्यवधी प्रेक्षक विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे हे सामने पाहात असतात. या आकडेवारीची तुलना विश्वचषक फुटबॉल किंवा ऑलिम्पिक उद्घाटन-समारोप प्रेक्षकसंख्येशीच होऊ शकते. इतर कोणत्याही खेळांमध्ये दोन देशांतील सामन्यांसाठी इतका प्रेक्षकवर्ग जगभर लाभण्याचे दुसरे उदाहरण नाही.