मंगल हनवते

ठाण्यावरून बोरिवलीला जाण्यासाठी आज सव्वा ते दीड तास लागतो. वर्दळीच्या वेळी दोन तासही लागतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी-वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. आता या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या असून पावसाळ्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या भूमिगत मार्गामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि हा कधी पूर्ण होणार याबाबत घेतलेला हा आढावा…

IDBI Bank , Privatization , Bid , Investment,
या बँकेची खासगीकरण प्रक्रिया एक टप्पा पुढे; संभाव्य बोलीदारांची छाननी सुरू असल्याचा केंद्राचा दावा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Vadhavan port to Igatpuri expressway,
वाढवण-इगतपुरी प्रवास केवळ एका तासात; महामार्गासाठी १८ हजार कोटींचा खर्च; प्रकल्प अंमलबजावणीच्या व्यवहार्यता अभ्यासाला वेग
mumbai metropolitan region development planning by mmrda
एमएमआर ग्रोथ हबसाठी अंमलबजावणी कक्षनियोजन विभागाकडून स्थापना, आर्थिक विकास वाढीसाठी अनेक प्रकल्प
maharashtra cabinet approves rs 315 5 crore for repair leaks in temghar dam
टेमघर धरणाची गळती थांबणार;  जाणून घ्या, गळती रोखण्यासाठी किती कोटींची तरतूद
Vishwa Marathi Sammelan 2025
Vishwa Marathi Sammelan 2025 : अनोख्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद; तीन दिवसांत ३५ हजार पुस्तकांचे आदान-प्रदान
Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन

वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध पर्याय पुढे?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. हे प्रकल्प राबविताना वाहतूक व्यवस्थेचे विविध पर्यायही पुढे येत आहेत. त्यातूनच मेट्रो, मोनो, सागरी सेतू, सागरी मार्ग, जोडरस्ता, उन्नत मार्ग असे पर्याय आज पुढे आले आहेत. त्यात आता भूमिगत/भुयारी मार्गाचीही भर पडली आहे. एमएमआरडीएतर्फे ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असा एक भूमिगत मार्ग बांधण्यात येणार आहे. तसेच एमएमआरडीए ठाणे – बोरिवली भूमिगत मार्गही बांधणार आहे.

मूळ प्रकल्प ‘एमएसआरडीसी’चा?

ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी सध्या बराच वेळ लागतो. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने ठाणे- बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार आज एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे.

विश्लेषण: रखडलेल्या गृहप्रकल्पांना वाली कोण?

कसा असेल भुयारी मार्ग?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. तर हा मार्ग सहा मार्गिकेचा (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन) असणार आहे. या प्रकल्पासाठी ११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेप्रमाणेच या प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची सद्य:स्थिती काय? मार्ग कधी पूर्ण होणार?

एमएसआरडीसीकडून ताब्यात आलेला प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने कामाला सुरुवात केली आहे. एमएसआरडीसीच्या आराखड्यात काही बदल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. नव्याने आराखडा तयार केल्यानंतर त्याला मंजूर घेण्यास काही काळ गेला; पण आता सुधारित आराखडा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार बांधकामासाठी नुकतीच निविदा जारी करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यात कामाला सुरुवात करण्यात येण्याची शक्यता आहे.

विश्लेषण: खेळणी जप्त का केली जात आहेत?

ठाणे-बोरिवली अंतर २० मिनिटांत पार करण्यासाठी आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र ठाणे-बोरिवली दरम्यानचे अंतर भूमिगत मार्गे २० मिनिटांत पार करण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Story img Loader