केंद्र सरकारने भारतीय युवकांना लष्करी सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मागच्या वर्षी ‘अग्निपथ’ योजना सुरू केली. या माध्यमातून भारतीय लष्करात चार वर्षांकरिता सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला. योजना सुरू होण्यापूर्वी देशभरात या योजनेविरोधात युवकांचा असंतोष पाहायला मिळाला. विरोधकांनीही या योजनेची आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरती झालेल्या एका अग्निवीराचा शनिवारी सियाचीन येथे मृत्यू झाला. त्यानंतर अग्निवीरांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण अग्निवीर मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना काय मिळणार? पेन्शन सुरू होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसने आरोप केला की, देशासाठी बलिदान देणाऱ्या हिरोंचा हा अवमान आहे. शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबीयांना कोणताही मोबदला किंवा पेन्शन दिली गेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. केंद्र सरकारने या आरोपांची दखल घेतली असून लष्कराने यावर प्रत्युत्तर दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा