जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) ११ मार्च २०२० रोजी अधिकृतपणे कोविड १९ या विषाणूला करोना महामारी म्हणून घोषित केले होते. आज या घटनेला बरोबर तीन वर्षे होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी आजच्याच दिवशी करोना महामारी जगभर पसरल्याचे जाहीर केले होते. अनेक देशांत किंवा खंडात एखाद्या साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यास त्याला महामारी म्हणून घोषित केले जाते. साथीच्या रोगापेक्षा महामारीचे रोग हे अधिक लोकांना प्रभावित करतात, तसेच यामध्ये मृत्यूचा आकडाही अधिक असतो. कोविड १९ च्या महामारीने भारतीय नागरिकांच्या जीवनात अनेक मूलभूत बदल घडवून आणले. लाखो लोक या महामारीने प्रभावित झाले तर असंख्य लोकांना आर्थिक फटका बसला. यानिमित्ताने आधुनिक भारतात आलेली पहिली आणि मोठी महामारी कोणती होती? त्याचा भारतावर काय परिणाम झाला, याबाबत घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा