कर्नाटक राज्याने एक दशकानंतर काँग्रेसच्या बाजूने निर्णायक असा बहुमताचा कौल दिला. २०१३ मध्ये काँग्रेसने १२२ जागा आणि ३६ टक्के मते मिळवली होती. शनिवारी (१३ मे) काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या असून जवळपास ४३ टक्के मते मिळवली आहेत. काँग्रेससोबत आघाडी केलेल्या सर्वोदय कर्नाटका पक्षाने एक जागा जिंकली. यामुळे भाजपाने जिंकलेल्या ६६ जागांपेक्षा काँग्रेसची संख्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेऊनही भाजपाला खूप मोठा पराभव सहन करावा लागला आहे. पंतप्रधान मोदींनी प्रचाराला स्वतःचा रंग दिला होता. डबल इंजिनच्या सरकारवर भर देऊन विकासाचा वेग वाढविण्यासाठी भाजपाला मत द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी विभाजनवादी मुद्द्यांनाही हात घातला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत असताना ‘बजरंग बली’चा उद्घोष करण्यात आला. पण या क्लृप्त्या या वेळी कामी आलेल्या नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा