संजय जाधव

सध्या अनेक क्षेत्रांत कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) शिरकाव होऊ लागला आहे. एआयमुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही नेहमी कानावर पडत आहे. यातच एआयच्या वापरामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे गजराज यंत्रणा. भारतीय रेल्वेकडून ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे लोहमार्ग ओलांडणाऱ्या हत्तींचा मृत्यू रोखला जाईल. भारत हा आशियाई हत्तींचे मूळ निवासस्थान मानला जातो. एकूण आशियाई हत्तींपैकी सुमारे ५० टक्के भारतात आहेत. देशात ३२ हत्ती अभयारण्ये असूनही त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. याला अवैध शिकारीसोबतच हत्तींच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. सध्या जंगलातून जाणाऱ्या सातशे किलोमीटर लांबीच्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. काय आहे नेमकी गजराज यंत्रणा?

e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?
loksatta analysis how political instability in bangladesh adversely affecting Indian healthcare
विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?
Construction quality, certificate, Maharera,
विकासकांना बांधकामाचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र बंधनकारक, महारेराच्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र प्रसिद्ध करावे लागणार
kutuhal
कुतूहल: प्रगत हयूमनॉइड

आतापर्यंत किती हत्तींचे मृत्यू?

देशभरात डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पाच वर्षांत ४९४ हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यातील प्रमुख कारणे रेल्वे अपघात, विजेचा धक्का, शिकारी आणि विषबाधा ही आहेत. सर्वाधिक मृत्यू होण्याचे कारण वीजप्रवाहित तारांना स्पर्श होणे हे असून, त्यामुळे पाच वर्षांत तब्बल ३४८ हत्तींचा त्यामुळे मृत्यू झाला. त्याखालोखाल रेल्वे अपघातात ८०, तर शिकारीमुळे ४१ आणि विषबाधेमुळे २५ हत्तींचा मृत्यू झाला आहे. देशातील हत्तींपैकी ३० टक्के रानटी हत्ती दाट जंगलात राहतात, तर मानवी हस्तक्षेपामुळे विरळ झालेल्या जंगलात उरलेले हत्ती राहतात. त्यामुळे मागील काही काळात हत्ती आणि मानव असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला.

आणखी वाचा-विश्लेषण: व्हेनेझुएला-गयानातील वादाचे कारण काय? भारतावर कोणता परिणाम?

गजराज यंत्रणेची गरज का?

हत्तींचे सर्वाधिक मृत्यू वीजवाहक तारांना स्पर्श झाल्यामुळे होतात. जंगलाशेजारील भागांमध्ये शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी तारेच्या कुपंणातून वीजप्रवाह सोडतात. त्यामुळेही हत्तींचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल रेल्वेची धडक होऊन हत्तींचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेक जंगलांमधून लोहमार्ग गेले असून, ते हत्तींच्या नैसर्गिक मार्गांमधून गेलेले आहेत. त्यामुळे हत्ती त्यांच्या नैसर्गिक मार्गांनी जाताना लोहमार्ग ओलांडतात. यामुळे अनेक वेळा रेल्वे अपघात घडत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, देशात रेल्वेची धडक बसून दर वर्षी सरासरी २० हत्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासातून गेलेल्या लोहमार्गांवर ही यंत्रणा बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

यंत्रणा कशी चालते?

एआय आणि ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करून संगणक प्रणाली लोहमार्गांवरील दोनशे मीटरच्या अंतरातील संशयास्पद हालचाल शोधते. हत्तीने लोहमार्गावर पाऊल ठेवताच कंपने तयार होतात. ही कंपने सेन्सरपर्यंत पोहोचतात. त्यातून ऑप्टिकल केबल फायबरच्या ऑप्टिकल सिग्नलमध्ये बदल होतात. त्यातून पुढे लोहमार्गावर धोका असल्याचा संदेश मिळतो. ऑप्टिकल फायबर केबलच्या पाच मीटरपर्यंतच्या अंतरातील हालचाल यंत्रणा टिपते. सिग्नलमधून पुढे लोहमार्गावर सुरू असलेली हालचाल कळण्यासोबत लोहमार्गावर हत्ती आहे की दुसरा प्राणी अथवा मानव याचीही कल्पना मिळते. संगणकीय प्रणालीमुळे प्राण्यांची हालचालच नव्हे, तर किती प्राणी त्या ठिकाणी आहेत, हेही कळते. ही यंत्रणा रेल्वेचा चालक, नियंत्रण कक्ष आणि स्थानक प्रमुखाला याबाबत इशारा देते.

आणखी वाचा-विश्लेषण : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईस विलंब का?

यंत्रणेची आधी चाचणी कुठे?

गजराज यंत्रणा ही काही नवउद्यमी कंपन्यांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. तिचा वापर पहिल्यांदा आसाममध्ये प्रायोगिक तत्त्वावर केला गेला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आसाममध्ये दीडशे किलोमीटर लांबीच्या लोहमार्गांवर तिचा वापर करण्यात आला. तिला चांगले यश मिळाले. या यंत्रणेच्या चाचणीत काही बाबी समोर आली. त्यानुसार तिच्यात काही सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता तिची अचूकता ९९.५ टक्के झाली आहे. याचबरोबर आसाममध्ये या यंत्रणेमुळे अनेक हत्तींचे प्राण वाचले आहेत.

भविष्यात नियोजन काय?

आसाममध्ये गजराज यंत्रणेकडून डिसेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत नऊ हजार ७६८ इशारे देण्यात आले. दिवसाला सुमारे ४१ इशारे रेल्वेला मिळाले. आसाममध्ये हत्तींच्या नैसर्गिक ११ अधिवासातून गेलेल्या लोहमार्गावरून बसविलेल्या या यंत्रणेमुळे एकाही हत्तीचा अपघात नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वेने आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ, झारखंड ही राज्ये आणि छत्तीसगड व तमिळनाडूतील काही भागांमध्ये जंगलातील लोहमार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. पुढील आठ महिन्यांत ती बसविली जाणार असून, त्यासाठी सुमारे १८१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आगामी काळात या यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी वन विभागाशी रेल्वे मंत्रालयाची चर्चा सुरू आहे.

sanjay.jadhav@expressindia.com