Vasant Panchami & Nizamuddin Dargah: भारतीय संस्कृतीत ऋतूबदल हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे. भारतभर वसंत पंचमीच्या सोहळ्याने या ऋतूचे स्वागत करण्यात आले. माघ शुक्ल पंचमी ही वसंतपंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत पंचमीपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. प्राचीन कालखंडात वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेकडील राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘फाग’ ह्या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो. वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कामदेव-रतीची पूजा करण्याचीही प्रथा आहे. विशेष म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर या दिवशी पिवळ्या रंगाची चादर चढवून सुफी बसंत साजरा केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा