अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं म्हटलं जातं. अन्नाविषयी किंवा एकंदरीतच सगळ्या अन्नपदार्थाशी आपल्या काही ना काही भावना, संवेदना जुळलेल्या असतात. एखादा पदार्थ खूप आवडतो, एखादा खावा लागतो, तर काही पदार्थ नकोसे असतात. मनापासून किंवा आवडीने खाण्याबरोबरच वजन, लाईफ स्टाईल, ट्रेंड्स अशा गोष्टीसुध्दा आपल्या पदार्थांच्या निवडीवर परिणाम करतात आणि मग खाण्याच्या तक्रारी सुरु होतात. शरीरात कॅलरीज वाढल्याने वजन वाढलं असं सांगितलं जातं. मग नेमक्या कॅलरीज वाढतात तरी कशा याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असता. जसं की वाहनं चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेलची गरज असते अगदी तसंच. वेगवेगळी काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या उर्जेला कॅलरीज म्हणू शकतो. ही उर्जा आपल्याला आवश्यक खाद्यपदार्थातून मिळते. यासाठी रोजची काम करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरीजचे सेवन करणं आवश्यक आहे. पचन प्रक्रियेत अन्नपदार्थांद्वारे तयार होणारी उष्णता केवळ किलोकॅलरीजमध्ये मोजली जाते. आपण जे काही अन्न खातो ते पचनक्रियेने उष्णता ऊर्जा निर्माण होते. उदाहरणार्थ, एक ग्रॅम प्रथिने पचवल्यास चार कॅलरीज आणि एक ग्रॅम चरबी नऊ कॅलरीज उष्णता निर्माण करते. प्रत्येक व्यक्तीच्या उष्णतेच्या गरजा वेगळ्या असतात. या गरजा त्याच्या शरीराच्या आकारमानानुसार आणि कामानुसार बदलतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा