मोदी सरकारने तीन कृषी कायदे मंजूर करून (नंतर मागे घेतले) आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. कृषी कायद्यांबाबत जून २०२० साली पहिल्यांदा अध्यादेश काढण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२० रोजी कायदे मंजूर करण्यात आले. १९९१ साली ज्याप्रमाणे आर्थिक सुधारणा केल्या गेल्या, त्या धर्तीवर कृषी क्षेत्रात सुधारणा करत आहोत, असे चित्र सरकारने उभे केले होते. तीन कृषी कायद्यांपैकी पहिला कायदा होता “शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा”. या कायद्यानुसार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करू शकत होता. यामुळे व्यापारी, किरकोळ विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदार हे शेतकऱ्याकडून थेट माल विकत घेऊ शकत होते. यामध्ये लागवड आणि पुरवठा कराराचाही समावेश होता. तसेच शेतकऱ्यांकडून किती माल विकत घ्यायचा, त्यापैकी किती मालाची वाहतूक आणि साठवणूक करायची यावरही मर्यादा घालण्यात आल्या नव्हत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा