आयटी क्षेत्रात मिळणार्या सोयी-सुविधा, मोठमोठे पॅकेज अशा अनेक कारणांमुळे अनेकांना आयटी कंपनीत काम करण्याची इच्छा असते. परंतु, आयटी कंपनीतील कामाचा तणाव सर्वांनाच झेपेल असं नाही. अनेक आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने ते त्रस्त आहेत. कर्नाटकमध्येही आता एका प्रस्तावावरून वाद सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारने आयटी कर्मचार्यांसाठी कामाची वेळ १४ तास करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. खासगी उद्योगांमध्ये स्थानिकांसाठी नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर मोठा गदारोळ झाल्यानंतर या प्रस्तावावरही नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अद्याप या विषयावर काहीही सांगितलेले नाही. या प्रस्तावात नक्की काय? कामाच्या वाढलेल्या तासांचा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा