लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वतीने सादर करण्यात आलेला सरकारविरोधातील अविश्वास ठराव मांडण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अविश्वास ठरावावर कधी चर्चा घ्यायची, याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय सदस्यांसोबत चर्चा करून ठरविला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या मागणीसाठी विरोधक पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (२० जुलै) आक्रमक आहेत. मात्र, सरकारकडून फारशी दखल न घेतल्यामुळे विरोधकांच्या वतीने काँग्रेसचे खासदार गौरव गोगाई यांनी अविश्वास ठराव मांडला. मंगळवारी (२५ जुलै) काँग्रेसचे लोकसभा सभागृहनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येऊन अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे सुतोवाच केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा