Pakistan out of FATF Gray List: १९४७ साली भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यापासूनच दोन्ही देशांमधले संबंध कायमच पराकोटीचे ताणले गेलेले राहिले आहेत. गेल्या ७० हून अधिक वर्षांमध्ये दोन देशांमधले संबंध सलोख्याचे होऊ शकले नाहीत. अखंड हिंदुस्थानमधूनच हे दोन वेगळे देश तयार झाले असले, तरी अजूनही या देशांमधलं वैर संपण्याचं नाव घेत नाहीये. याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान सरकारकडून वेळोवेळी घेतली जाणारी आडमुठी भूमिका आणि दहशतवादी कारवाया. या सगळ्यामुळे दोन्ही देशांमधील सामान्य नागरिकांना मात्र प्रचंड मनस्ताप आणि नुकसान सहन करावं लागत आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांसाठी होत असलेल्या अर्थपुरवठ्याला आळा घालण्यात अपयश आल्यामुळेच FATF नं या देशाला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकलं होतं. पण नुकतंच पाकिस्तानचं नाव यातून बाहेर काढण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा