८ डिसेंबरपासून नेपाळ-भारत सीमेवरील बरियापूर गावात गढीमाई उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात दूरदूरहून हजारो भाविक एकत्र येतात. या भागात गढीमाई सणाला फार महत्त्व आहे. मात्र, याच ठिकाणी या उत्सवावरून वाददेखील निर्माण झाला आहे. वादाचे कारण म्हणजे दर पाच वर्षांनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात हजारो प्राण्यांची हत्या केली जाते. या प्राण्यांमध्ये उंदीर, कबुतरे, बकऱ्या व म्हशींचादेखील समावेश असतो. या उत्सवात सामूहिक बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे हिंदू देवी गढीमाई संतुष्ट झाल्यामुळे समृद्धी मिळते, अशी मान्यता आहे. या उत्सवाला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव म्हणूनही ओळखले जाते जगभरातील प्राणीप्रेमींकडून या उत्सवाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. काय आहे गढीमाई सण? आणि त्यादरम्यान हजारो प्राण्यांचा बळी का दिला जातो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा