पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी ‘प्रधानमंत्री सूर्योदय’ योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली (Solar Panel) बसवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्याबाबतची ही पहिलीच योजना नाही. त्यापूर्वी भारत सरकारने २०१४ मध्ये अशाच प्रकारची एक योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २०२२ पर्यंत ४० गीगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही मुदत २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना हे लक्ष्य पूर्ण करण्याचाच एक भाग असल्याचे दिसून येते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना नेमकी काय आहे? भारताची सध्याची सौरऊर्जा निर्मिती क्षमता किती? आणि सौरऊर्जा निर्मिती भारतासाठी महत्त्वाची का? याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा