हजारो शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून आहेत. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. शेतकर्यांना रोखण्यासाठी मोठमोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. पंजाबमधील आंदोलक शेतकरी एमएसपी, कर्जमाफीसाठी कायदेशीर हमी, यासह इतर मागण्या मान्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करत आहेत. यातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात तीन बैठका पार पडल्या. मात्र, तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या. रविवारी संध्याकाळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे शेतकरी नेत्यांच्या बरोबर चौथ्या फेरीच्या चर्चेसाठी चंदिगड, सेक्टर २६ येथील महात्मा गांधी राज्य सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले. या बैठकीत शेतकर्यांचे १४ प्रतिनिधी सहभागी झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा