पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये जीवाश्म इंधनाची भूमिका मोठी असल्याचं आज सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सेमीकंडक्टरचे मोठे योगदान राहणार आहे. गेल्या काही वर्षांत जगाने तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती केली आहे. सेमीकंडक्टरने आपल्या तंत्रज्ञानाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक स्तरावर ताकद वाढवण्यासाठी भारताला आधी सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रभुत्व मिळवावे लागेल. टाटा कंपनी ही तैवानच्या पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्परेशन (PSMC) या कंपनीबरोबर मिळून गुजरातमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार आहे. गुजरातच्या धोलेरा गावात हा पहिला प्लांट उभारण्यात येणार आहे. टाटा आणि पॉवरचिपची २०२६ पर्यंत भारतात २८ नॅनोमीटर चिप तयार करण्याची योजना आहे. गुजरात आणि आसाममधील दोन चिप तयार करणाऱ्या प्लांटना मोदी सरकारने अलीकडेच मान्यता दिली आहे. भारताला पुन्हा जागतिक ताकद वाढवण्यासाठी सेमीकंडक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारताने या क्षेत्रात ताकद वाढवल्यास जगातील कोणतीही शक्ती त्याला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. खरं तर आतापर्यंत आपण अर्धसंवाहकांसाठी आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळेच सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय आणि भारताला पुन्हा जागतिक ताकद करण्यात ते कसे महत्त्वपूर्ण योगदान देईन हे जाणून घेऊ यात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा