पर्यावरणाच्या बाबतीत सजग असणाऱ्या जगभरातील मंडळींकरिता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रात हजारो वर्षांपासून साठलेला बर्फ वितळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जगभरातील किनारपट्टीलगत असलेल्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, हे आपण अनेकदा ऐकत, वाचत आलो आहोत. ही समस्या उद्भवू नये, यासाठी जागतिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र एका नव्या अहवालानुसार, कार्बन उत्सर्जनात जगभरातील देशांनी कपात करण्याचे प्रयत्न केले तरीही पश्चिम अंटार्क्टिकाच्या सभोवताली असलेल्या समुद्रातील उबदार पाण्यामुळे या ठिकाणची बर्फाची चादर (ice sheet) झपाट्याने वितळणे आता अटळ आहे, असे निदर्शनास आले आहे. जर बर्फाची चादर पूर्णपणे वितळली, तर जागतिक समुद्र पातळीत ५.३ मीटर किंवा १७.४ फूट एवढी पाण्याची पातळी वाढू शकते. असे झाले तर भारतासहित जगभरात किनारपट्टी भागात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा