पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी इस्लामाबादने भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याची कबुली दिली. १९९९ मध्ये नवाज शरीफ यांनी वाजपेयींबरोबर करार केला होता. त्यावेळी नवाज हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. कारगिल युद्धाच्या संदर्भात जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर निशाणा साधत नवाज यांनी त्यांच्या पक्ष पीएमएल-एनच्या बैठकीत २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर वाजपेयी साहेबांनी येथे येऊन आमच्याशी करार केला, पण आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले, ही आमची चूक होती, असंही ते म्हणालेत. २१ फेब्रुवारी १९९९ रोजी स्वाक्षरी करण्यात आलेला लाहोर करार हा भारत-पाकिस्तान संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा होता. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील तुटलेले संबंध पुन्हा जोडण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक शिखर परिषदेतून या कराराचा जन्म झाला होता. लाहोर करार काय होता आणि पाकिस्तानने त्याचे कसे उल्लंघन केले याचा आपण आढावा घेऊ यात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा