जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठे वादंग माजले आहेत. मोदी सरकारकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीला भाजपा पक्ष घाबरला आहे, असा दावा विरोधक करीत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांकडून तुम्हाला भारत या नावात काय अडचण आहे, असा सवाल विरोधकांना केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन नेत्यांनी आपल्या देशाला इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे कशी दिली? ही नावे देताना संसदेत काय चर्चा झाली? तेव्हा देशासाठी कोणकोणती नावे सुचवण्यात आली होती? हे जाणून घेऊ या …
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा