खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी केला. भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावताना हा आरोप मूर्खपणाचा आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. कॅनडाने निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रॉ च्या कॅनडातील केंद्र प्रमुखांची हकालपट्टी केली. त्यानंतर भारतानेही जशास तसे उत्तर दिले असून भारतातील कॅनडाच्या सहायक उच्चायुक्तांची मंगळवारी (१९ सप्टेंबर) हकालपट्टी केली. गेल्या काही महिन्यांपासून कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये तणावाचे संबंध दिसत होते, त्याला आता नाट्यमय वळण लागले आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी जी-२० परिषदेमध्ये परस्पर सहकार्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा केली होती. तरीही कॅनडाने भारतीय उच्चायुक्तांवर कारवाई का केली? त्यामागची पार्श्वभूमी काय? याचा घेतलेला आढावा ….
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा