बलुचिस्तानच्या मुसाखेल जिल्ह्यात सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळी बंदूकधार्यांनी बस आणि ट्रक थांबवले, प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यांची ओळख विचारली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला; ज्यात २३ जणांचा मृत्यू झाला. “पंजाबला जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधील लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या,” असे मुसाखेलचे सहायक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले. अतिरेक्यांनी यावेळी १० गाड्या पेटवल्याचेही सांगण्यात आले. बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला नाही. या वर्षी एप्रिलमध्ये बलुचिस्तानच्या नोश्की शहराजवळ नऊ पंजाबी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यात सहा पंजाबी मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये तुर्बतजवळील कामगार छावणीवर झालेल्या हल्ल्यात बंदूकधाऱ्यांनी २० बांधकाम कामगारांना ठार केले. ते सर्व कामगार सिंध आणि पंजाबमधील होते. बलुच अतिरेकी पंजाबींना लक्ष्य का करीत आहेत? इतिहासातील घटनांशी याचा काय संबंध? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा